Saturday, November 17, 2018

अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र २९-३० नोव्हेंबरच्या 'किसान मुक्ती मार्च' विषयी सर्व मोर्चेकऱ्यांना महत्वाच्या सूचना

२९-३० नोव्हेंबरच्या 'किसान मुक्ती मार्च' विषयी सर्व मोर्चेकऱ्यांना महत्वाच्या सूचना


१. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून किसान सभेच्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या संयुक्त नेतृत्वाखाली होणाऱ्या २९-३० नोव्हेंबरच्या 'दिल्ली चलो' 'किसान मुक्ती मार्च' मध्ये सामील होण्याचे किसान सभेच्या कोल्हापूरच्या राज्य कार्यशाळेत ठरले आहे.

२. सर्व मोर्चेकऱ्यांनी २८ नोव्हेंबरला सायंकाळपर्यंत किंवा उशिरात उशिरा २९ नोव्हेंबरला पहाटेपर्यंत हजरत निझामुद्दीन रेल्वे स्टेशनवर उतरावे. हे स्टेशन नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या आधीचे स्टेशन आहे. 

३. किसान सभेचे राज्य/जिल्हा/तालुका बॅनर, झेंडे, बिल्ले, लाल टोप्या मोठ्या प्रमाणात आणाव्यात. तेथे आपल्या लॉंग मार्चच्या लाल टोप्या विक्रीसाठी ठेवल्या जातील.

४. २८/२९ नोव्हेंबरला निझामुद्दीनला पोहोचल्यावर येण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे - गुरुद्वारा बाळासाहेबजी, सराई कलेखान, निझामुद्दीन. २८ नोव्हेंबरला रात्री राहण्याची सोय तेथेच आहे. मात्र तेथे स्वच्छता राखली पाहिजे आणि बिडी, सिगारेट, तंबाखू इत्यादीच्या सेवनावर पूर्ण बंदी आहे हे लक्षात ठेवावे. 

५. २९ नोव्हेंबरला सकाळी तेथून मोर्चा निघेल आणि सायंकाळपर्यंत तो नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर पोहोचेल. रात्री तेथे चांगला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. 'आप' पक्षाच्या दिल्ली राज्य सरकारने या मोर्चाच्या व्यवस्थेत मदत करण्याचे मान्य केले आहे. 

६. ३० नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता अतिविशाल 'किसान मुक्ती मार्च' रामलीला मैदानावरून सुरू होईल आणि तो संसदेवर जोरदार चाल करेल. विराट जाहीर सभा झाल्यावर सायंकाळी ६ वाजता सभा संपेल आणि शेतकरी परत जाऊ शकतील. 

७. 'नेशन फॉर फार्मर्स' या मंचातर्फे देशभर या मोर्चाचा प्रचार आणि प्रसार विविध प्रकारे उत्कृष्टपणे केला जात आहे. त्यात विविध समाज विभाग आपापले उत्तम योगदान करत आहेत.

डॉ. अशोक ढवळे
आ. जे. पी. गावीत
किसन गुजर
अर्जुन आडे
डॉ. अजित नवले
*किसान सभा राज्य केंद्र*



No comments:

Post a Comment